Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी
सांगली :  भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रभा पाटील म्हणाल्या की, सरदार वल्लभभाई पटेल हे वकिली व्यवसायात निपुण होतेच त्याचबरोबर त्यांनी राजकारणातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी ते अखेरपर्यंत लढले.  मिठाचा सत्याग्रह आणि असहकार चळवळीत त्यांनी गांधीजींना मोलाचे सहकार्य केले. फाळणी नंतर देशात अस्थिरता निर्माण झाली होती त्या काळात सरदार वल्लभभाई पटेल यांनी विखुरलेल्या देशाचे एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून खऱ्या अर्थाने ते 'लोहपुरूष' ठरतात.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणाले की,  सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य राष्ट्र उभारणीसाठी अत्यंत मोलाचे आहे.  भारतातील एक राजकीय व सामाजिक नेता म्हणून  त्यांची ख्याती सर्वदूर आहे. स्वतंत्र भारताचे ते पहिले गृहमंत्री होते. भारताची एकता आणि अखंडता यासाठी त्यांनी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस  'राष्ट्रीय एकता दिन'  म्हणून घोषित केला आहे. 

यावेळी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)