Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी


सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ पतंगराव कदम महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांची एक आदर्श विचारधारा होती. सर्व जातिधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे आचार- विचार हे सामाजिक क्रांती आणि परिवर्तन घडवून आणणारे आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक विचारांची समाजाला गरज आहे. एक आदर्श राजा म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा नावलौकिक सर्वदूर आहे. त्यांचे कर्तृत्व, साहस आणि दूरदृष्टी हे गुण आजही आपल्याला प्रेरणा देणारे आहेत. 
         
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अमित सुपले, प्रा. टी. आर. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नंदकुमार नाटके यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)