डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी निवड
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी निवड
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली मधील विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर गुणवत्ता शिष्यवृत्ती साठी निवड करण्यात आली.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली. त्यामध्ये बी.ए.भाग- २ व ३ मधून प्रथम आलेला श्री. गणेश वसंत साळुंखे याला तर बी. एस्सी.भाग-१ व २ मधून प्रथम आलेली कु. मनाली संपत दाभोळकर हिला शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती निवड करण्यात आली. या दोन विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाकडून प्रशस्तीपत्रे व शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात आली.
याबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे यांनी यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व त्यांना प्रोत्साहन देताना म्हणाले की, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण अभ्यास करून उत्तम गुण मिळवले. व शिवाजी विद्यापीठ गुणवंत यादीत आपले नाव कोरले. असे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती करण्यासाठी अशा स्वरूपाच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. विद्यार्थ्यांनी या मिळालेल्या संधीचे सोने करून आपले भविष्य उज्वल करावे.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह व माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम, महाविद्यालय विकास समिती व भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणेचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिताताई जगताप, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, प्राचार्य डॉ. एम.एस.सगरे व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनी शाबासकी देऊन त्यांचे कौतुक केले.
सदर विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना सातपुते व डॉ. तृषांत लोहार यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. या मिळवलेल्या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment