Header Ads

Loknyay Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार क्रांती आणि परिवर्तन घडवून आणणारे : डॉ. डी.जी. कणसे

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार क्रांती आणि परिवर्तन घडवून आणणारे : डॉ. डी.जी. कणसे

सांगली : 'छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांनी स्त्रिया व शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे आचार- विचार हे सामाजिक क्रांती आणि परिवर्तन घडवून आणणारे आहेत.' असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.  येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रतिमापूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, सामाजिक कलह, जाती-धर्मातील तेढ,  वाढती अराजकता अशा परिस्थितीत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक विचारांची समाजाला गरज आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांची मानवतावादी, समतावादी,  बहुजनवादी भूमिका ही केवळ महाराष्ट्रापुरतीच नव्हे तर जगासमोरील एक आदर्श विचारधारा आहे.  एक आदर्श राजा म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा नावलौकिक सर्वदूर आहे.  त्यांचे विचार, कर्तृत्व, साहस आणि त्याग हे गुण आजही आपल्याला नवप्रेरणा देणारे आहेत. आज 'शिवजयंती' हा उत्सव विशिष्ट समूहाचा राहिला नसून तो लोकोत्सव झाला आहे. या लोकउत्सवाला जागतिक दर्जा मिळवून देण्याची जबाबदारी ही पुरोगामी महाराष्ट्राची आहे.
       
 
या वेळी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख  डॉ. नितीन गायकवाड, प्रा. जे. डी. हाटकर, प्रा. सतीश कांबळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील  प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक  उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)