Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा
     
  
सांगली :  भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी राष्ट्रीय एकतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे म्हणाले की,  सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य राष्ट्र उभारणीसाठी अत्यंत मोलाचे आहे.  भारतातील एक राजकीय व सामाजिक नेता म्हणून  त्यांची ख्याती सर्वदूर आहे.  स्वतंत्र भारताचे ते पहिले गृहमंत्री होते. भारताची एकता आणि अखंडता यासाठी त्यांनी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस  'राष्ट्रीय एकता दिन'  म्हणून घोषित केला आहे.  सरदार वल्लभभाई पटेल शेतकऱ्यांच्या हितासाठी अखेरपर्यंत लढले.  त्याचबरोबर मिठाचा सत्याग्रह आणि असहकार चळवळीत त्यांनी गांधीजींना मोलाचे सहकार्य केले. फाळणी नंतर देशात अस्थिरता निर्माण झाली होती त्या काळात सरदार वल्लभभाई पटेल यांनी विखुरलेल्या देशाचे एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून खऱ्या अर्थाने ते 'लोहपुरूष' ठरतात.
          
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'एकता रॅलीचे' आयोजन करण्यात आले होते. 
      
यावेळी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. विकास आवळे, डॉ.रूपाली कांबळे,डॉ. वर्षा कुंभार,डॉ. वंदना सातपुते,डॉ.महेश कोल्हाळ, डॉ. कृष्णा भवारी,प्रा. सतिश कांबळे, प्रा.ए.ए.कुंभार, प्रा.नरेश पवार, प्रा.वाय.सी. धुलगंड, प्रा.एच. व्ही.वांगीकर इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या मार्फत करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)